नारळ पाणी पिण्याचे फायदे | Health Benefits of Coconut Water
नारळपाणी | Coconut Water
नारळ पाणी हे आपल्यासाठी काही नवीन नाही ते लहानग्यांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच आवडत आणि त्यातल्या त्यात नाराळापासून बनलेले पदार्थ सुद्धा खूप चविष्ट लागतात जसे की नारळाची बर्फी , नारळाचे लाडू आणि नारळाचे दूध इ. परंतु या सर्वांपेक्षा नारळ पाणी हे शरीरासाठी खूप गुणकारी मानले जाते.
नारळ पाण्यामध्ये अतिशय महत्वाचे पोषकतत्वे असतात जे अनेक शारिरीक समस्यांमध्ये गुणकारी ठरतात . नारळ पाणी पिल्याने संपूर्ण शरीर हे निरोगी राहण्यास खूप मदत होते त्याचप्रमाणे नारळ पाणी पिल्याने अशक्तपणा सुद्धा दूर होतो.
नारळ पाणी पिण्याचे अनेक असे लाभदायी फायदे आहेत जे आपण खालील प्रमाणे सविस्तर बघणार आहोत.
नारळ पाण्यात असणारे महत्वाचे पोषकतत्वे कोणते ?
● कॅलरीज ( Calories )
● प्रोटीन ( Protein )
● फॅट ( Fat )
● साखर ( Sugar )
● आयरण ( Iron )
● कार्बोहायड्रेट ( Carbohydrate )
● कॅल्शियम ( Calcium )
● पोटॅशिअम ( Potassium )
● सोडियम ( Sodium )
● मॅग्नेशिअम ( Magnesium )
● व्हिटॅमिन क ( Vitamin C )
नारळपाणी पिण्याचे फायदे-Health Benefits of Coconut Water
1) हृदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी
नारळ पाण्यामध्ये अतिशय महत्त्वाचे पोषक तत्वे आहेत ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते तसेच नारळ पाण्यामुळे रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहते.
2) पचनक्रिया सुधारण्यास मदत
दररोज सकाळी एक ग्लास नारळ पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते तसेच नारळ पाण्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि ऍसिडिटी पासून सुद्धा आराम मिळतो
3) अशक्तपणा दूर करण्यास मदत
नारळ पाण्यामध्ये कॅल्शिअम , मॅग्नेशिम , पोटॅशिअम आणि इतर पोषक तत्वे असल्यामुळे ते अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात.
4) रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत
नारळ पाणी पिल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते त्याचबरोबर मधुमेहामुळे आलेला अशक्तपणा सुद्धा कमी होण्यास मदत होते.
5) शरीर डीटॉक्स करण्यास मदत
दररोज एक ग्लास नारळ पाणी पिल्यामुळे शरीरातील विषारी घटक हे बाहेर पडण्यास मदत होते आणि त्यामुळे शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण होते.
6) किडनी स्टोनचा धोका कमी करते
नारळ पाणी पिल्याने किडनी स्टोन चा त्रास कमी होण्यास मदत होते त्याच बरोबर नारळ पाणी हे किडनी निरोगी ठेवण्यास सुद्धा मदत करते.
7) शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते
उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी हे फार गुणकारी असते ते शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते आणि उष्माघातापासून सुद्धा आपले संरक्षण करते.
8) वजन कमी करण्यास मदत
दररोज उपाशीपोटी एक ग्लास नारळ पाणी पिल्याने वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते आणि वजन नियंत्रणात सुद्धा राहण्यास उपयुक्त ठरते.
9) त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत
नारळ पाणी पिल्याने किंवा त्वचेवर लावल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत होते कारण नारळ पाण्यामध्ये अनेक महत्वाचे व्हिटॅमिन्स असतात.
10) तणाव कमी होण्यास मदत
नारळ पाण्यामध्ये असे काही महत्वाचे घटक आहेत जे मानसिक तणाव हा कमी करण्यास मदत करतात म्हणून नारळ पाणी पिणे हे तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
येथे क्लीक करून वाचा आवळा ज्युस पिण्याचे फायदे
नारळपाणी कधी व कसे प्यायचे ?
● नारळपाणी हे दिवसभरातून कधीही पिले तरी चालते परंतु नारळपाणी जर का सकाळी उपाशीपोटी घेतलं तर अधिक गुणकारी मानलं जातं.
● नारळ पाणी किंवा नारळापासून बनलेले पदार्थ सुद्धा तुम्ही खाऊ शकता जसे की नारळाची बर्फी , नारळाचे लाडू , नारळाची चटणी , नारळाची कँडी , नारळाचे दूध इ
( ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी नारळाचे गोड पदार्थ खाणे टाळावे )
नारळ पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम कोणते ?
● नारळपाणी पिल्यामुळे तसे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत परंतु एका दिवसात एक किंवा दोन यापेक्षा अधिक नारळपाणी पिल्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो किंवा जुलाब होऊ शकतात.
● त्वचेला कुठलीही ऍलर्जी किंवा इन्फेकशन असल्यास त्वचेला नारळ पाणी लावू नये.
● नारळ पाण्यामध्ये कुठलाही मसाला किंवा मीठ टाकून पिऊ नये ते त्रासदायक ठरू शकत.
टीप-वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे आम्ही कुठलाही वैद्यकीय सल्ला देत नाही किंवा उपचार सुचवत नाही .तुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.