तणाव कमी करण्यासाठी ह्या 10 गोष्टी लक्षात ठेवा | Stress Management

तणाव :

आजकालच्या दगदगीच्या जीवनात तणाव हा आपल्या जीवनाचा भाग झालाय . परंतु अनियंत्रित तणाव हा आपल्यासाठी खूप धोकेदायक आहे आणि त्यामुळे आपल्याला नैराश्य , मधुमेह , उच्च रक्तदाब ( हाय ब्लडप्रेशर ) , हृयविकार , मेंदू विकार आणि इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात .म्हणून आपल्या तणावावर नियंत्रण असणं फार गरजेचे आहे .

तणावाची लक्षणे कोणती ?

थकवा , डोकेदुखी , मनात भीती असणे , श्वास घेण्यास त्रास होणे , हृदयाची धडधड वाढणे , सतत विचारात राहणे , भूक न लागणे , झोप न येणे , पोट खराब होणे , कोणत्याही कामात मन न लागणे इ . ही काही तणावाची प्रमुख कारणे आहेत .

खाली दिलेल्या ह्या दहा गोष्टी तुमचा तणाव कमी करण्यात मदत करतील .

1) नकारात्मक लोकांपासून दूर रहा

आपल्या स्वभवताली दोन प्रकारची लोकं असतात एक म्हणजे सकारात्मक विचारांची आणि दुसरी म्हणजे नकारात्मक विचारांची , आपण अडचणीत असतांना आपण कोणत्या लोकांचा सल्ला घेतोय ते आधी लक्षात घ्या नंतरच त्यांचा सल्ला घ्या , अनेक वेळा आपण चुकीच्या व्यक्तींकडून सल्ला घेतो किंवा त्यांकडून आपल्याला मिस गाईड होतं , आणि त्यामुळे आपलं कोणतंही काम ठीक होत नाही आणि मग त्यामुळे आपण तणावग्रस्त होतो , त्याकरता आपण जास्तीतजास्त सकारात्मक विचारांच्या लोकांमध्ये राहील पाहिजे किंवा त्यांचा सल्ला घेतला पाहिजे .

2) स्वतःला दोष देऊ नका

आपण कोणत्याही कामात अपयशी झालो की अगोदर स्वतःला दोष देतो , परंतु त्याअगोदर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण एक माणूस आहोत . आणि माणसाकडून चुका ह्या होतच असतात , म्हणून त्याकरता आपण स्वतःला दोष देणं योग्य नाही , ज्या ज्या वेळेस आपण स्वतःला दोष देत असतो त्या त्या वेळेस आपलं मानसिक खच्चीकरण होत असतं आणि त्यामुळे आपण तणावात जात असतो . त्याकरता आपण कुठे चुकतो आहे यावर काम करून उपाय शोधत रहा , परंतु स्वतःला दोष देणं बंद करा .

3) आपल्या परिवाराशी चर्चा करा

आपण आपल्या रोजच्या जीवनात अनेक समस्यांना तोंड देत असतो आणि त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यावर अनेक मार्ग सुद्धा काढत असतो परंतु आपल्या आयुष्यात अनेकदा अश्या सुद्धा समस्या निर्माण होतात की त्या समस्यांवर आपल्याजवळ काहीच उपाय नसतो मग अश्या परिस्थितीत आपण निराश होतो किंवा आपली फार चिडचिड होते आणि त्यामुळे अनेकदा आपण तणावग्रस्त सुद्धा होतो . मग अश्यावेळेस आपल्या परिवारातील मोठ्या व्यक्तींशी चर्चा करून काहीतरी मार्ग काढावा , आपल्या परिवाराशी आपण आपल्या समस्यांविषयी चर्चा केल्यास आपलं मन हलकं होतो आणि आपल्याला धीर सुद्धा मिळतो त्यामुळे आपला तणाव हा बऱ्यापैकी कमी होतो .

4) योगा आणि प्राणायाम करा

आजकाल लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत योगा आणि प्राणायमचे महत्व सगळ्यांनाच माहीत आहे . योगा आणि प्राणायाम मध्ये खूप शक्ती आहे ते अनेक आजारांवर मात करण्यास उपयुक्त आहे , तणाव कमी करण्यासाठी योगा आणि प्राणायाम करणं फार गुणकारी मानलं जातं , त्यामुळे आपल मन आणि डोकं शांत राहत ज्यामुळे आपला तणाव कमी होण्यास मदत होते . त्याकरता आपण दररोज किमान अर्धा तास तरी योगा आणि प्राणायाम केला पाहिजे आणि त्याच बरोबर व्यायाम करण सुद्धा महत्वाचं आहे .

5) योग्य आहार

आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहार फार महत्वाचा असतो आणि ते सुद्धा योग्य आहार , आपला रोजचा आहार जर योग्य नसेल तर आपल्याला अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागत . त्याचप्रमाणे आपल्याला तणाव मुक्त राहायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्या आहारात बदल करणं आवश्यक आहे .
हिरवा भाजीपाला , डार्क चॉकलेट , फायबर युक्त धान्य , व्हिटॅमिन सी युक्त आणि अँटी-ऑक्सिडंट युक्त फळे इ .आपल्या आहारात असणे गरजेचे आहे त्यामुळे आपलं तणाव बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते .

6) मोबाईलचा वापर कमी करा

मोबाईलचा वापर करणं काही चुकीची गोष्ट नाही , ती काळाची गरज आहे , त्यामुळे आपली अनेक कामे सोपी होतात परंतू मोबाईलचा अति प्रमाणात वापर करणे हे फार धोकेदायक आहे त्यामुळे आपल्या डोळ्यांवर आणि मेंदूवर सुद्धा वाईट परिणाम होत असतो , त्याचप्रमाणे मोबाईलच्या म्हणजेच सोसिअल मीडिया च्या माध्यमातून आपल्या डोक्यात अनेक नकारात्मक गोष्टी जात असतात आणि त्यामुळे आपण तणावग्रस्त होण्याची शक्यता वाढून जाते .

7) पुरेशी झोप घ्या

आपल्याला माहीतच आहे की झोप ही शरीसाठी फार महत्वाची आहे परंतु ती पुरेशी हवी , दिवसभर दगदग आणि त्यात रात्रीचं जागरण आपल्या शरीरासाठी धोकेदायक आहे , दररोज निदान 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे . त्यामुळे दिवसभर काम करून थकलेल्या शरीराचा आरामही होतो आणि तणाव सुद्धा कमी होण्यास मदत होते .

8) व्यसनांपासून जास्तीत जास्त दूर रहा

कुठलंही वाईट व्यसन हे शरीरासाठी धोकेदायक असतंच , त्यामुळे अनेक गंभीर अश्या शारीरिक समस्या उदभवतात काही लोकं तणाव कमी करण्यासाठी वेगवेगळे व्यसन करतात त्यांना असं वाटत की त्यामुळे आपला तणाव कमी होईल परंतु व्यसनामुळे तणाव अजून वाढून जातो , त्यामुळे व्यसनांपासून जास्तीत जास्त दूर राहणं गरजेचं आहे .

9) चिडचिडेपणा कमी करा

दररोज आपल्या कामाच्या दगदगीमुळे आपला चिडचिडपणा होतो त्यामुळे आपल्या कामात अडथळा निर्माण होतो आणि मग त्यामुळे आपल्याला तणाव येतो . त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेऊन आपला चिडचिडपणा कमी करण्याचा प्रयत्न करावा .जेणेकरून डोकं शांत राहील आणि आपलं कामात मन लागेल आणि त्यामुळे आपण तणावमुक्त सुद्धा राहू .

10) अध्यात्माच्या सहवासात राहा

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की अध्यात्म असा एकमेव मार्ग आहे जो आपलं मन आणि डोकं शांत करतो आणि त्यामुळे आपला मानसिक त्रासही कमी होतो अध्यात्मामुळे आपल्या डोक्यात नेहमी सकारात्मक विचार जात असतात आणि त्यामुळे आपण तणावात जाण्यापासून वाचत असतो .त्याकरता दररोज थोडावेळ अध्यात्मासाठी द्यावा .

टीप- वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे , तुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या किंवा तणावा संबंधी काही समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा .

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *