उष्माघाताची कारणे , लक्षणे आणि खबरदारी | Symptoms of Heat Stroke

उष्माघात : कारणे , लक्षणे आणि खबरदारी

उन्हाळा आला म्हणजे ऊन आलं आणि ऊन आलं म्हणजे उष्माघाता सारखी गंभीर समस्या आली , आपल्या देशामध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अति भयंकर अशी उष्णतेची लाट येत असते आणि त्यात आपल्या महाराष्ट्रात सुद्धा उष्णतेची मोठी लाट असते ,आपल्या राज्यात अशी काही शहरे आहेत तिथे दरवर्षी 42 डिग्रीच्या वरती तापमान असते , जसे की जळगाव , भुसावळ , अकोला ,चंद्रपूर , नागपूर , इ .

उन्हाळ्या मध्ये जास्त करून जी लोकं बाहेर उन्हामध्ये काम करत असतात त्यांना उष्मघाताला सामोरं जावं लागत आणि त्यात काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा होतो परंतु आपण उन्हाळ्यामध्ये काही गोष्टींची खबरदारी घेतल्यास आपण उन्हापासून सुरक्षित राहू शकतो .

उष्माघात होण्याची कारणे काय ?

● जास्तवेळ उन्हामध्ये फिरणे किंवा बसणे
● उन्हामध्ये कुठलीही विश्रांती न घेता सतत काम करणे
● एखाद्या कारखान्यामध्ये उष्ण तापमानाच्या ठिकाणी काम करणे
● उन्हाळ्यात खूपच कमी पाणी पिणे आणि त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होणे

उष्माघाताची लक्षणे कोणती ?

● ताप येणे ( शरीराचे तापमान अचानक वाढणे )
● हृदयाची धडधड वाढणे , श्वासाची गती वाढणे
● अति प्रमाणात डोके दुखणे आणि जड पडणे
● थकवा येणे , चक्क येणे , त्वचा लाल किंवा कोरडी होणे
● मानसिक स्थिती बिघडणे , बेशुद्ध होणे
● मळमळ होणे , उलटी होणे आणि जुलाब होणे
● उष्माघातामुळे रक्तदाब वाढण्याचीही फार शक्यता असते

उष्माघात झाल्यावर काय करावे ?

● उष्माघात झालेल्या रुग्णाला सर्वप्रथम झाडाखाली किंवा हवेशीर खोलीत न्यावे
● पंख्याखाली किंवा कुलर मध्ये रुग्णाला ठेवावे
● अंगावरील कपडे सैल करावे आणि पाण्याने ओला केलेला रुमाल पूर्ण अंगावर टाकावा
● कपाळावर थंड पाण्याच्या पट्या ठेवत राहणे
● तळहातांना आणि तळपायांना कांद्याचा रस लावावा
● उष्माघात गंभीर असल्यास रुग्णाला त्वरित डॉक्टरांकडे न्यावे

उष्माघात होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी ?

● बाहेर उन्हात काम करत असतांना मध्ये मध्ये हवेशीर सावलीखाली थोडी विश्रांती घ्यावी
● घरामध्ये पंखा आणि कुलरचा वापर करावा
● दिवसभर पाणी भरपूर प्यावे जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही
● दुपारी 12 ते 3 दरम्यान बाहेर जाणे टाळावे आणि जर का बाहेर जात असाल तर डोक्यावर रुमाल किंवा टोपी असावी
● बाहेर जातांना नेहमी सोबत पाण्याची बॉटल असावी
● उन्हाळ्यात हलके कपडे घालावेत आणि ऊन लागू नये म्हणून डोक्यावर छत्री सुद्धा वापरावी
● डोळ्यावर गॉगल्स आणि पायात बूट , चप्पल वापरावी
● सकाळी सकाळी लवकर बाहेरील कामे आटपून घ्यावीत

● निंबू सरबत , ओ आर एस , मोसंबी ज्यूस , संत्री ज्यूस , उसाचा रस , कैरीचे पन्हे यापैकी कुठलेही पेय दिवसभरातून एकदा तरी घ्यावे
● लहान मुले , वृद्ध व्यक्ती , आजारी रुग्ण आणि गरोदर महिला यांनी बाहेर उन्हात जाणे टाळावे .
● अचानक डोके दुखल्यास , अस्वस्थ वाटल्यास , उलटी झाल्यास , ताप आल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

डॉक्टरांकडे केव्हा जावे ?

उष्माघात ही समस्या फार गंभीर आहे त्यामध्ये रुग्णाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो त्याकरता , तुम्हाला अचानक ताप येणे , डोके दुखणे , मळमळ होणे , अस्वस्थ वाटणे , हृदयाची धडधड वाढणे यासारखी कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जावे .

टीप- वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *